मुद्द्दा क्र. १. आहेच... त्याला वाद नव्हेच.. परंतु बाकी रस्ते, शिक्षण, शेतकऱ्याचा आत्महत्या, प्रदूषण, पाणी पुरवठा ह्यावर अजून विचार व्हायलाच हवा...
जोपर्यंत सत्ता नाही तोपर्यंत टिका, सत्ता मिळाली कि चुना.. हे धोरण आत्तापर्यंत सर्वपक्षिय होत.. सगळ्यांन्ना चान्स देऊन पाहिलाय, आता मनसेला देऊन पाहु..( नाहितर तेच तेच आहेच कि... !!)
आणि, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे केवळ राजकारणाचा मुद्दा होऊन बसला आहे... ? शेतकरी देखील जाणत आहेत... नुसती पॅकेजेस देऊन हे थांबणार नाही ! - तर निट उपाय करणे आवश्यक आहे... !
आधी टॅक्स बुडवणार्या आणि लाच खाणार्यांकडे पहा....चुकार पोलीस आणि त्यांची अरेरावी.... मुर्ख कामकाजी नियम आणि त्यांच्या अंमलबजावणीतील फ़ोलपणा.... ह्यावर कष्ट घेतले तरी खुप झाले... !!