ह्या कवितेत मला कोठे वृत्तदोष दिसला नाही. (चू. भू. द्या. घ्या. )
उद्धव वृत्त
गा गागागागा गागा - गा गागागागा गागा
असे तोडून लिहिले असते तर वृत्त अधिक स्पष्ट झाले असते असे मला वाटते.
उदा.
रस्ता भरलेला असतो - अन गर्दी साचत असते
जहरील्या फुत्कारांनी - हे विश्वच तापत असते
नाही म्हणायला
नेहमीच कसे विरोधी येतात विचार मनी ह्या
ह्या ओळीत लय सुधारण्यासाठी वाव आहेसे वाटते. त्यासाठी
नेहमी विरोधीच कसे - येतात विचार मनी ह्या
असा बदल सुचवावासा वाटतो.
जहरील्या शब्दाला काही पर्याय मिळाला तर बरे होईल असे वाटते. एक सुचवण -
फुत्कारांतून विखारी - हे विश्वच तापत असते