कथेचें वळण वा शेवट बदलण्यासंबंधीं नाहीं. पण भाषेची पकड आणि नाट्य दोन्हीं अंगानें कथा घसरली नसली तरी सुरुवातीची उंची राखतां आली नाहीं. एक पंच दत्तारामला दगडांनीं ठेंचून मारायची शिक्षा देतात हा प्रसंग कांहीं कमी नाट्यपूर्ण नाहीं. परंतु तो प्रसंग फारच रसहीन रीतीनें कथन केला आहे. एखादा चार दिवस मस्त रंगलेला कसोटी सामना शेवटीं कोणताही संघर्ष न होतां पाऊस पडल्यामुळें अनिर्णीत राहावा तसें वाटलें.
सुधीर कांदळकर.