लेखनात स्त्री (किंवा पुरुष) असा उल्लेख स्वतःला स्त्री (किंवा पुरुष) मानणाऱ्या व्यक्तीची मानसिकता असा आहे हे सदैव लक्षात ठेवणे आगत्याचे आहे, रुढ अर्थाने किंवा सर्रास वापरला  जाणारा स्त्री (किंवा पुरुष) असा शब्दार्थ अभिप्रेत नाही. लेखनाचा ओघ आणि भाषा सौंदर्य या दृष्टीने स्त्री आणि पुरुष असे सरळ शब्द लिहीले आहेत

तुमच्या विनंतीला मान देऊन तुमचे लेखन स्त्री-पुरुष या ऐवजी माणूस असा अद्वैतसूचक शब्द वापरून वाचून पाहिले तर काहीच अर्थबोध झाला नाही. मग म्हटले जाऊ दे आपण भाषा सौंदर्याचा आस्वाद घेऊ म्हणून पुन्हा स्त्री-पुरूष असे शब्द ठेवूनच लेखन वाचले. भाषा सौंदर्य कुठेही जाणवले नाही. म्हणजे केवळ या शब्दांमुळे ते येऊ शकते का याचा ही शोध घेऊन पाहिला. पण सगळेच फुसकाट निघाले.

स्त्रियांनी आपल्या वैषम्याच्या निवारणा साठी शोधलेला सर्वोत्तम उपाय म्हणजे आर्थिक स्वावलंबन हा आहे कारण त्यांनी स्वतःचा असा ठाम समज करून घेतला आहे की पुरुषांचे वर्चस्व हे केवळ त्यांच्या हातात पैसा आहे म्हणून  आहे. यातून देहाची हेळसांड, सहजीवनाचा उडालेला बोजवारा आणि जिथे सहज श्रम-विभागणी व्हावी आणि सुखाचे सहजीवन व्हावे अशी अपेक्षा आहे तिथे स्वतःसाठी तणाव निर्माण करून ठेवला आहे.

तुम्ही काही ठिकाणी स्त्री असा उल्लेख आला की तिथे अभिप्रेत अर्थ पहावा असा उल्लेख केला आहे. तुमच्या वरील वाक्यात हा अभिप्रेत अर्थ कसा बसवायचा कळले नाही. त्यामुळे तुम्हाला काही गोष्टी नीट उलगडाव्यात म्हणून स्त्री पुरुष या शब्दांचा ढोबळ अर्थाने वापर करून लिहिते. स्त्रियांनी अर्थार्जन केले की सहजीवनाचा बोजवारा कसा काय उडतो ? पुरुषाने केले की उडत नाही.   तणाव निर्माण होत नाही. हे तुमचे अद्वैत काही कळले नाही. देहाची हेळसांड म्हणजे ? स्त्रियांनी अर्थार्जन करून देहाची हेळसांड न करता २४ तास घरात सहजीवनासाठी उपलब्ध असावे असे तर नाही ना म्हणायचे? म्हणजे तुमच्या मते सुखी सहजीवनासाठी कुणीच अर्थार्जन करायचे नाही की काय? व्वा व्वा. छान छान.

वास्तविकतः प्रणय ही दोघाना आनंद देणारी साधी नैसर्गीक क्रिया आहे आणि तिची उत्कटता ही प्रतिसाद आणि एकमेकांचे ट्युनिंग यावर अवलंबून असते पण त्यात देखील इगो इशू करून त्याची यथावकाश वाट लावली जाते.
इथेही वाट कशी आणि कोण लावते ते स्पष्ट नाही. इगो इशू कोण करते ? तुमचे अद्वैतच करत असेल तर त्यासाठी ओरड कशाला?

वैतागलेला पुरुष मग ...अमके शिखर सर कर, तमक्या ग्रहावर जा जे पूर्णपणे निरर्थक आणि आयुष्य वाया घालवणारे असते. बाकी जवळ जवळ सगळे निष्कारण आणि काहीही गरज नसताना काहीतरी उत्पादन करण्यामागे किंवा कार्यमग्न राहण्या मागे लागलेले असतात त्यामुळे नैसर्गीक संपत्तीचं नुकसान आणि हजारो लोकांची आयुष्य राबवली जातात.  
आयुष्य सार्थकी लावाचया एकच मार्ग सुखी सहजीवन. नैसर्गिक संपत्तीत वाढ करायची म्हणजे प्रजोत्पादन का ? बाकी सगळे वाया... 'गरज नसताना काहीतरी उत्पादन करणारे' म्हणजे ?  तुमच्या गरजेची नसलेली वस्तू इतरांनीही आपल्या गरजेची नाही असे का समजावे ? कार्यमग्न राहण्यात काय वाईट आहे ? तुम्ही असले लेखन करून लोकांचा वेळ वाया घालवला असे कुणी म्हटले तर? म्हणणारा म्हणू शकतोच ना?( मी तसे म्हणणार नाही कारण माझी छान करमणूक झाली आहे)

त्यामुळे प्रतिसाद लिहीताना (आणि वाचताना) लेखनाचा हेतू आणि अर्थ दोन्ही लक्षात घेणं आवश्यक आहे नाहीतर या लेखनाचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही
नाही घेतला तरी करमणूक म्हणून छान उपयोग झाला लेखनाचा.

अगदी उदात्त सुरुवात करून नंतर पद्धतशीरपणे पारंपरिक श्रमविभाजनावर उतरलात की राव. बाकी शेवटी मोक्षात मात्र उदात्तपणे स्त्रियांना (ढोबळ अर्थ)सामावून घेतलेत. मोक्ष-बिक्ष कुणी बघितलाय. द्या स्त्रियांनाही स्थान. पण अर्थार्जन करतात म्हणजे काय? म्हणजे अगदी 'काम' आणि 'अर्थ' यांनाच प्रमुख मानून स्त्रियांना चारित्र्याच्या संशयावरून किंवा हुंड्यावरून मोक्ष देणाऱ्यांच्या विचारात आणि या लेखातील विचारात मला तरी काही फरक दिसला नाही. 

ज्यामच विनोदी वाटले एकंदरीत सगळे.