"कोणाच्यातरी अनुभवाचा फायदा घेण्यासाठी, आधी 'कोणीतरी' स्वतः अनुभव घेणं आवश्यक आहे."
आनंद क्रियेत किंवा अनुभवात नाही, तुम्ही स्वतःच आनंद आहात. जेंव्हा तुमची कोणतीही इच्छा जेंव्हा पूर्ण होते तेंव्हा कोणतीही इच्छा नसल्यामुळे तुमची जाणिव परत स्वतःशी संलग्न होते (किंवा तुम्ही परत स्वतःपर्यंत येता) आणि हे रिलॅक्सेशन म्हणजे आनंद असतो.
तुम्ही जर इच्छापूर्तीतून आनंद होतो असा (जो रूढ) समज आहे तो करून घेतलात तर पुन्हा नवी इच्छा त्यासाठी परत जाणिवेची उन्मुखता आणि जाणिवेची सदैव उन्मुखता हेच तणावाचे कारण असल्यामुळे इच्छातृप्ती साठी प्रयास, पुन्हा इच्छा (समजा पूर्ण झाली) तर त्यातून येणारे रिलॅक्सेशन की परत नवी इच्छा असं चक्र सुरू होतं! जर इच्छातृप्ती आनंद देत असती तर मायकेल जॅक्सन कशाला झोपेची औषध घेत राहिला असता?
समाजात लौकीक अर्थाने यशस्वी होणाऱ्याचा बहुमान आहे आणि असे लोक फार कमी असल्यामुळे जे लौकीक अर्थाने यशस्वी होऊ शकत नाहीत त्यांना त्याचे प्रलोभन आहे. पण तुम्ही यशस्वी माणसाचे जीवन किती तणावपूर्ण असते त्याची दखल घेत नाही.
रूढ अध्यात्मात इच्छा बंधन आहे म्हंटले आहे पण निरीच्छेनी माणूस निरस होतो; त्यामुळे इच्छा असून पंचाईत आणि नसेल तर निरसता अशी परिस्थिती आहे. यातून रसपूर्ण जगण्याचा काय मार्ग आहे? तर एकच : इच्छा तुमच्यापेक्षा मोठी होता कामा नये. थोडक्यात तुम्ही कोणत्याही क्रियेत स्वतःशी संलग्न असला पाहिजे! पण या साठी स्वः गवसायला हवा. स्वः म्हणजे काय, तर रिलॅक्सेशन! तुम्ही जर रिलॅक्स्ड असाल तर तुम्हाला भव्य किंवा अतिरेकी गोष्टींची व्यर्थाता लगेच लक्षात येईल आणि तुमची ध्येयं (किंवा इच्छा) तुमच्यावर स्वार होणार नाही.
तुम्ही पृथ्वीवरच भोगू शकत नाही तर मंगळावर काय भोगणार? तुम्ही घरीच स्वस्थ नाही तर एव्हरेस्टवर जाऊन कसे सुखी व्हाल?
ओशोंच एक सुरेख वाक्य बघः " जो अभी और यहीं सुखी नही है, वो कहीं भी और कभीभी सुखी नही हो सकता!"
ओशों सारखा सर्व उपभोगांनी परिपूर्ण माणूस असं का म्हणतो? कारण: तुम्हीच सुख आहात! माझा सर्व प्रयत्न फक्त तुम्हाला तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आहे.
संजय