सरकारी खातें आल्यामुळें माझ्या डोळ्यांना वेगळा चष्मा लागला. अर्थात सरकारी माणसें अजूनही सचोटीची असल्याचें आढळतें. त्याबद्दलचे माझे अनुभव मी लौकरच लिहीनहि, तसेंच खाजगी कंपन्यात देखील कट ठेवणें इ. भ्रष्टाचार चालतोच. डॉक्टर मंडळी कट ठेवतात तोही भ्रष्टाचारच.

असो. आपण म्हटल्याप्रमाणें वरचा भ्रष्टाचाराचा चष्मा काढला तर दिघ्यांना आपला पैसे न बुडवण्याचा लौकिक तसेंच आपल्या खात्यांतल्या माणसाचा शब्द जपावासा वाटला हें कबूल करावेंच लागतें. तरी त्यांनीं अगोदर कां चालढकल केली हें कळत नाहीं.

सुधीर कांदळकर