मानवाची अलिकडिल काळातील प्रगती खरोखरच कधीनकधी त्या प्रगतीच्याच मुळावर उठणारी आहे हे निश्चित. तसेच त्या प्रगतीला आवष्यक संसाधने फार मोठ्या प्रमाणावर ओरबाडल्यामुळे हळू हळू पृथ्वीचे वाळवंटीकरण होत जाईल असेही दिसते.
पण म्हणून पृथ्वीवर येणार्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीलाही मानवास सरळ जवाबदार धरणे हा अतिरेक/अंधश्रद्धा झाली. प्रदुषण वाढल्यामुळे त्याचा त्रास माणसाला, तसेच इतर सजीवांना होतोच. झाडेतोड झाल्यामुळे त्या त्या ठिकणच्या पर्यावरणाची हानी होते, अनेक सजीव जातात, अनेक जाती नष्टप्राय होतात हेही खरेच आहे. पण म्हणून त्याचा संबंध होणार्या वादळ, दुष्काळ, अवर्षण, अतिवृष्टी आणि चक्क भूकंपांशी जोडणे, हे पाप वाढल्यामुळे रोगराई पसरते या समजुतीपेक्षा फार वेगळे नाही.
आकाशस्थ ग्रहतार्यांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम जसा विज्ञानाच्या आधारे सिद्ध करता येत नाहि, तसेच प्रदुषण, अतिप्रमाणात कार्बन उत्सर्जन याचा भुकंपाशी संबंध लावता येत नाही.
असा संबंध जोडू पाहणारे, उलट पर्यावरण चळवळीची हानी करत आहेत. कारण हेच मुद्दे घेऊन अनिर्बंध प्रगतीचे पुरस्कर्ते पर्यावरणवाद्यांना खोटे पाडतात/पाडू शकतात. आणि शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने, एकूणच पर्यावरणाविषयी बोलणेच विज्ञान विरोधी आहे असे म्हणू लागतात.

आणि यावर मला पडणारा प्रश्नः या प्रगतीचा सर्व फायदाघेणार्या आपल्यासारख्यांना त्याविरुद्ध बोलण्याचा काय अधिकार?