एक शिक्षक म्हणून मी या विधेयकाचे स्वागत करतो. जितकी स्पर्धा अधिक, तितकी प्रतिभावंतांना संधी अधिक असे मी मानतो. परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशामुळे भारतातल्या किडक्या, कुचकामी शिक्षणसंस्थांना आपला दर्जा सुधारावाच लागेल. भारतीय शिक्षणयंत्रणेच्या दृष्टीने हे सुचिन्ह आहे, असे मला वाटते.