ती तिच्या घरांत, नातेवाईकांत, मित्रपरिवारांत, परिचितांत पोकळी निर्माण करते. परंतु विंदांसारखे कवी त्यांच्या रसिकांच्या मनांत घर करून बसलेले असतात. त्यांच्या जाण्यानें रसिकांच्या मनांत पोकळी निर्माण होतेच. कुसुमाग्रज, विंदा इ. कवींचें रसिकाच्या हृदयांत काय स्थान आहे तें तेच जाणूं शकतील. जाणारी व्यक्ती आपल्या परिचयातील वा खास आवडीची असेल तरच हें जाणवतें. त्यामुळें हे शब्द तसे पोकळ वा फापटपसारा नाहींत असे माझें वैयक्तिक मत आहे. फक्त ते कोणाच्या संदर्भात आहेत त्याला महत्त्व आहे. एखाद्या भ्रष्ट नेत्याच्या बाबतीत नक्कीच पोकळ आहेत.
सुधीर कांदळकर