आहे. पण जालसुविधेच्या खंडामुळें मनांतलें मळभ आणि नकारात्मक विचार स्पष्ट दिसताहेत.
आता मात्र माणूस माणसापासून दुरावलाय. इतका की आपल्या रक्ताच्या
माणसांसाठीही त्याच्याकडे द्यायला वेळ नाहीये. सगळ्या सुखसुविधा आहेत पण
एकमेकांसाठी वेळ मात्र नाहीये. त्यामुळे माणसं तुटत चालली आहेत. जवळची
नातीही दुरावताहेत. कोणाकडे यायला जायला वेळ नाही. पत्र लिहायला वेळ
नाही. त्यामुळे कितीतरी आनंदाला मुकते आहे ही पिढी. आमंत्रण, पत्रं,
पोस्टमनची वाट, भेटीचा आनंद, विरहाचं दु:ख.......काहीच नाही. सगळं काही
इमेल, फोन यावरच निभतं. इतकं सगळं मेकॅनिकल झालंय ना....की त्यात काही
संवेदनाच उरली नाहीये. मोकळ्या हवेत खेळ, फिरायला जाणं, ते संवाद
साधणं..काहीच नाही. नवी पिढी तर इतकी घरघुशी झाली आहे ना........की ते
बघून आपलाच जीव गुदमरतो.
हें पटलें नाहीं. माणूस अंतरानें दुरावलाय हें खरें. पण दूरध्वनि, ई-मेल, चॅट इ. सुविधांमुळें जवळही आलाय. आजही आम्हीं एक डोंबिवलीचा, एक ठाण्याचा, दोन मुंबईचे दोन पुण्याचे असे अनेक जण स्काईपवर जमून भरभरून बोलतोंच कीं. किंबहुना जास्त जवळ आलों आहोंत. दुरावलेले बालमित्रमैत्रिणीही अचानक गूगलवर, ऑर्कूटवर दिसतात आणि पुनर्भेट होते. वेळीं अवेळीं वेळ खर्चून मनसोक्त गप्पाही होतात.
अलीकडे टूरिझम अर्थात सहलींचे प्रमाण तर पूर्वींपेक्षां वाढलें आहे. फक्त बाहेरगांवच्या कोणाकडे सहकुटुंब राहायला जाणें बंद झालें आहें. पण म्हणून जिव्हाळा कमी झाला असें नाहीं. कालाय तस्मै नमः हें खरेंच. पण दुरावणें कांहीं पटलें नाहीं. असो. हा नकारात्मक विचार बहुधा जालसेवेतल्या खंडामुळें आलेला असेल.
सुधीर कांदळकर