खरे तर विंदांसारख्या कवींना शब्दांच्या मापदंडात बसवणे अवघड! त्यात आपल्याकडेच काय, सगळीकडेच, वापरून वापरून गुळगुळीत झालेले शब्द पुन्हा पुन्हा वापरतात. (शब्दांच्या मर्यादा आणि नव्या शब्दांसाठी कल्पनाशक्तीला ताण देण्याची निरीच्छा, दुसरं काय!) त्यापेक्षा अगदी साध्या, नेमक्या शब्दांतील पण मनातल्या भावना थेट पोचवणारे लेख, श्रद्धांजली इत्यादी त्यांच्या भारंभार शाब्दिक फुलोरा नसलेपणामुळे हृदयास भिडतात असा माझा अनुभव आहे.