'पोकळी' या शब्दाचे एकवेळ समजून घेता येईल. पण तो शब्दही बाबा आदमच्या काळात जमा झाला आहे.
बाकीच्या शब्दांचे काय?
साहित्यिक गेल्यानंतर कोणतेही मृत्युलेख वाचा. त्यात खालील शब्द हटकून सापडतातच.
वाचकाला आत्मभान देणे, व्यक्तीकडून समष्टीकडे नेणे, नवी वाट निर्माण करणे, परंपरा झुगारून देणे...
या यादीत वाढण्याची सुप्त क्षमता आहे.
विनोदी साहित्यिक वगळून बहुतांशी गंभीर साहित्यिकांच्या मरणोत्तर समीक्षेत फरक असा वाटत नाही. चित्रे गेले तरी तेच शब्द, तेंडुलकर गेले तरी तेच शब्द, विंदा गेले तरी तेच शब्द. 
प्रत्येक साहित्यिकाचे किमान एक व्यवच्छेदक लक्षण जरी सांगितले गेले तर फरक दिसून येईल. पण तसे घडत नाही.