विनायकराव, कशाला स्वतःस त्रास करून घेताहात ? आता हे असेच चालायचे. "कालाय तस्मै नमः". तुम्ही नशीबवान आहात, महाराष्ट्रापासून खूप दूर आहात. त्यामुळे तुम्हास निदान तथाकथित मराठी वाहिन्यांवरून व वर्तमानपत्रांतून-नियतकालिकांतून मराठीवर दररोज व राजरोस चाललेले अत्याचार पाहावे, ऐकावे व वाचावे लागत नाहीत. सांप्रत, शुद्धतेचा आग्रह धरणे ह्यास मूर्खपणाचे लक्षण समजले जाते व तसा आग्रह धरणारा टिंगल-टवाळीचा धनी होतो.