त्यांच्याविषयी जितके बोलावे तेवढे थोडेच .. त्यांची स्तुती करायला मी योग्य पण नाही ..
घरी येणार आणि पहिल्यांदा माझं डोकं उजव्या हातानं घट्ट धरणार.. विचारपूस आणि मस्त गप्पा गोष्टि करणार .. जणू ते सुदधा आमच्याच वयाचे असल्यासारखे... आमचा एखादा मोठा भाऊ किंवा मित्रच .. गोष्टीतून शिकवण , विनोदातूनच टोमणे मारणार .. माझी चूक अशीच हसत खेळत दाखवून देणार ..
घरातून निघताना दर वेळेस विचारणार .."मग भूषण, परत कधी भेटणार ?" .. हा इतका उत्साही माणूस घरातून जाऊच नये असे वाटावं.. ह्याच विचारात आपण रमले असताना तिकडूनच गमतीच्या स्वरात उत्तर येणार "बरं, म्हणजे तुला आता मला भेटायची इच्छा नाही .. येतो .. " आणि चालायला लागणार ....
असाच एक प्रसंग सांगतो ..
आई मला ओरडत होती .. "अरे भूषण, आता दिवाळी संपून २ महिने होऊन गेले .. आता तो आकाशकंदील काढून टाक .. खराब होईल .."..
त्याच दिवशी पंत आले काही वेळानंतर .. गप्पा गोष्टी झाल्या .. ते निघाले .. चप्पल घालणार तेवढ्यात त्याचं लक्ष त्या आकाशकंदिलावर गेले ..
"अरे, अजून आकाशकंदील काढला नाही ... "
"किती दिवसांपासून सान्गतिये काढायला , ऐकतच नाहीये तो .. " आई आतून गरजली ..
पंत - "अहो तुम्ही पण ना ... उगाच भूषण ला कशाला त्रास, आणा ति खुर्ची , मी काढतो .. "
लाजेने खजील झालेला मे अखेर बोललो .. "अहो पंत, मे आत्ता जस्ट काढणारच होतो .. राहू द्या तुम्ही .."
पंत - " बरं, चला, येतो मी .. "
पंतांची पाठ वळते ना वळते, घड्याळाचे १/२ मीनट व्हायच्या आत, तो आकाशकंदील जागेवर गेला होता ..
असे वागण्यामधून शिकवण देणारे हे पंत ..