पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
जानेवारी महिना संपला की घामाच्या धारा वाहायला सुरुवात होते आणि अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु होतो. गेल्या वर्षी पक्षा यंदा जास्त उन्हाळा आहे, असे आपण दरवर्षी म्हणत असतो. मुंबईकर राज्यातील अन्य मंडळींच्या तुलनेत खूप सुखी. कारण अजून तरी येथील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले नाही. नाशिक, जळगाव, धुळे, भुसावळ, नागपूर आणि राज्याच्या अन्य भागात एप्रिल महिन्यातच तापमापकाने ४० चा पारा पार केला आहे. भुसावळ येथे तर ४५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. आत्ता ही अवस्था तर ऐन मे महिन्यात काय होईल