कुठेतरी वाचलेली एक प्रतिक्रिया आठवली - आई मुलाची थट्टा करत असते - "तू कुणाशी लग्न करायचे की तसेच एकत्र रहायचे हे सर्वस्वी तूच ठरवणार. ती मुलगी असावी इतकी माफक अपेक्शा ठेवायला काही हरकत नाही ना?"
संजोप जी म्हणतात तशी जागतिकीकरणाच्या या काळात असे सान्स्कृतीक धक्के पचवण्याची तयारी लागतेच. त्याचवेळी आपण पुरते हतबल नाही हे लक्शात घेउन काळाचे पोवाडे गाण्याऐवजी भारतीय विचारधारेतल्या सतश्रद्धा, नीतीमूल्ये आणि विवेक यांचे आचरण स्वतः करून त्या रुजवण्याचा प्रयत्नही करायला हवा. नंतर केविलवाणे हसायला लागण्याची शक्यता थोडीफार तरी कमी होईल. तसेही अतिरेकी व्यक्तीस्वातंत्र्य, भोगवाद (पाश्चीमात्य) आणि व्यक्तीस्वातंत्र्याची पुरती गळचेपी (साम्यवाद, काही वेडाचार पसरवणारे पंथ इ.) हे दोन्ही विचार भारताचे नाहीतच.