इष्ट, अनिष्टचे सर्व निकष आजकाल शिक्षण, भरपूर पगाराच्या नोकऱ्या आणि पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात बदलत चाललेत.
जसे मुलींना ठराविक नियमात/ अटींमध्ये बसणारा नवरा हवा असतो तसेच मुलांनाही आपल्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी करणारी, आपल्या करीयरला अग्रक्रम देणारी मुलगी बायको म्हणून नको असते. तडजोड दोन्ही बाजूंनी हवी. शिवाय आजकाल मुलींना लग्न केले नाही तरी त्यावाचून आपले अडत नाही हे लक्षात येऊ लागले आहे. पैसे कमावू लागल्यावर अनुभवता येणारे स्वातंत्र्य त्यांना लग्नानंतर अनुभवता येईलच याची शाश्वती नसते. अनेक गोष्टी परंपरा, रीत, मर्यादा इ. इ. नावाखाली मनाविरुद्ध कराव्या लागतात. सर्व निर्णय आपले आपण घेता येत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत. समाजात लग्ने व्हावयास हवी असतील तर मुलगा व मुलगी दोन्ही बाजूंनी तडजोड करायची तयारी ठेवायला हवी!