इष्ट, अनिष्टचे सर्व निकष आजकाल शिक्षण, भरपूर पगाराच्या नोकऱ्या आणि पाश्चात्यांचे अनुकरण करण्यात बदलत चाललेत.

सहमत.  भरपूर पगाराची नोकरी व पाश्चात्यांचे अनुकरण हे सहजीवनासाठी योग्य निकष नक्कीच नाहीत. मात्र पतीपत्नी दोघेही सुशिक्षित असणे सहजीवनासाठी आवश्यक आहे असे वाटते.

जसे मुलींना ठराविक नियमात/ अटींमध्ये बसणारा नवरा हवा असतो तसेच मुलांनाही आपल्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी करणारी, आपल्या करीयरला अग्रक्रम देणारी मुलगी बायको म्हणून नको असते.

ही तुलना दोन्ही बाजूंनी होते. मुलींनाही आपल्यापेक्षा कमी पगाराची नोकरी असणारा किंवा आपल्यापेक्षा कमी शिकलेला मुलगा चालत नाही.

तडजोड दोन्ही बाजूंनी हवी.

सहमत

शिवाय आजकाल मुलींना लग्न केले नाही तरी त्यावाचून आपले अडत नाही हे लक्षात येऊ लागले आहे.

सहमत. हे मुलांच्याही लक्षात आलेच आहे. ;) मात्र एकटेपणाचे फायदे-तोटे व वैवाहिक जीवनाचे फायदेतोटे हे प्रत्येकाने स्वतःच्या अग्रक्रमांवर तपासून पाहावेत.

पैसे कमावू लागल्यावर अनुभवता येणारे स्वातंत्र्य त्यांना लग्नानंतर अनुभवता येईलच याची शाश्वती नसते. अनेक गोष्टी परंपरा, रीत, मर्यादा इ. इ. नावाखाली मनाविरुद्ध कराव्या लागतात. सर्व निर्णय आपले आपण घेता येत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत.

 ज्या गोष्टी मनाविरुद्ध करण्याची तयारी नसेल अशा गोष्टी लग्नाआधीच स्पष्ट करणे आवश्यक आहे. शिवाय लग्नानंतर आपले आपण निर्णय घेण्याऐवजी सहमतीने निर्णय घेणे संसारासाठी आवश्यक व पोषक असावे.

समाजात लग्ने व्हावयास हवी असतील तर मुलगा व मुलगी दोन्ही बाजूंनी तडजोड करायची तयारी ठेवायला हवी!

सहमत.