गटार, शौचकूप ह्या गोष्टी सत्य असल्या तरी नकाराची ती मूळ कारणे नसण्याचीही शक्यता असेल असे वाटते. त्यातही दोन शक्यता आहेत. ज्याला/जिला नकार द्यायचा त्याला/तिलाच खरे कारण कळवायचे/कळवलेले नसेल किंवा त्याला/तिला खरे कारण कळवलेले असेल पण त्रयस्थांना सांगण्यासाठी अशी कारणे दिली गेली असतील. ... अर्थात हा सर्व माझा अंदाज/कल्पनाविलास आहे. प्रत्यक्षात अशा पद्धतीच्या विवाहमेलनाचा मला अनुभव नाही.
शिवाय मृदुला ह्यांचे म्हणणेही पटण्यासारखे आहे. कारण काहीही असले स्पष्ट नकार केव्हाही चांगला, असे मलाही वाटते.