कारण प्रेमात पडतांना सगळेच अगदी
डोळसपणे आंणि तोलून मापून प्रेमविवाह करत नाहीत. पण लग्न झाल्यावर मात्र ते
टिकवण्याचा प्रयत्न करतात. मग दाखवून ठरवून केलेल्या विवाहाला मात्र का
अशा अडचणी येतात? हा प्रश्न एकंदरीत फार गुंतागुंतीचा आहे हे नक्की.
ही चर्चा 'लग्न झाल्यानंतर येणाऱ्या अडचणी' या विषयावर नसून, 'लग्न ठरवताना येणाऱ्या अडचणी' या विषयावर असावी असे वाटते. (चूभूद्याघ्या.) (चर्चाप्रस्तावाचे शीर्षक 'मुलींच्या अपेक्षा' असे आहे. अगोदर आपल्या अपेक्षा निश्चित ठरवून तंतोतंत त्याबरहुकुम कोणी हुकुमी प्रेमात पडत असावे असे वाटत नाही - पुन्हा चूभूद्याघ्या! त्यामुळे प्रेमविवाह हे प्रस्तुत चर्चाविषयाच्या कक्षेच्या मर्यादेबाहेर असावेत असे वाटते. तसेही चर्चाप्रस्तावाच्या मसुद्यात, ठरवून करण्याच्या विवाहांच्या बाबतीतील ठरवण्याच्या प्रक्रियेत मुलींच्या अवास्तव अपेक्षांमुळे अडचणी कशा येतात, पूर्वी अशा अवास्तव अपेक्षांची मक्तेदारी फक्त मुलांकडे आणि वरपक्षाकडेच कशी असे, अशाच बाबी नमूद केलेल्या आहेत, त्यावरून ही चर्चा केवळ ठरवून केलेल्या विवाहांपुरतीच मर्यादित असावी या संशयास पुष्टी मिळते. तिसऱ्यांदा चूभूद्याघ्या!) त्यामुळे चर्चाविषयाच्या व्याख्येनेच (१) प्रेमविवाह आणि (२) (कोणत्याही प्रकारच्या) विवाहानंतर येणाऱ्या (किंवा न येणाऱ्या) अडचणी आणि/किंवा (कोणत्याही प्रकारचे) विवाह टिकणे (अथवा न टिकणे) यांपैकी कोणत्याही विषयावरील (किंवा विषयांवरील) चर्चा ही प्रस्तुत चर्चाविषयाकरिता अवांतर ठरावी, असे सुचवावेसे वाटते. (आणखी एक चूभूद्याघ्या.)
(केवळ माहितीकरिता. आक्षेप नाही.)
अवांतर: न टिकलेले प्रेमविवाहही पाहिलेले आहेत. असो.
बाकी तुमचे मुद्दे विचार करण्यासारखे (आणि बहुतांशी पटण्यासारखे) आहेत, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)