इतकी वर्षे 'नाही' म्हणाय्चा अधिकार मुलींना नव्हता. आता कुठे समाजाच्या एका वर्गातिल मुलीना तो मिळू लागलाय असे दिस्तेय. पण हे लोकांना सहन होत नाहीये असे वाटतेय. अलीकडे असा तक्रारीचा सुर बरेच ठीकाणी ऐकू येतो.
पण मला एक कळत नाही 'गोरीच, सुंदरच मुलगी हवी' असे जेव्हा मुलगा म्हणतो तेव्हा यात काही गैर आहे असे कोणालाही वाटत नाही. मग मुलींना जर आर्थिकदृष्ट्या सबल मुलगा हवा असेल तर तशी अपेक्षा ठेवणे बिघडले कुठे ? कोणाला गरिबीत किंवा अगदी कमी जागेत आयुष्य घालवायला आवडेल. त्यातून जर त्यांचे लग्न व्हायला उशिर होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.
<<पुण्यातील मुलीस पुण्यातलाच मुलगा हवा असतो>> यात तर मला काहीच अयोग्य वाटत नाही. पुणे हे सुखाने राहण्यासाठी सर्व दृष्ट्या योग्य शहर आहे. उत्तम पाणी , हवा तसेच उत्तम शिक्षणाच्या सोयी आणि रोजगाराच्या अनंत संधी. हे असे इतके सगळे फायदे असताना कोण उठून इतर शहरात जाईल. शिवाय आजकाल मुली या एकटे अपत्य किन्वा फार तर एखादे भावंड असे असते. तेव्हा जसे मुलाच्या आई वडीलांना मुलाजवळ राहावेसे वाटते तसेच मुलीच्या आई वडीलांना देखिल आपली मुलगी डोळ्यासमोर असावी असे वाटले तर त्यात गैर काय?
<<मुलींनी आपल्या या अपेक्षांना मुरड घालणे इष्ट नव्हे काय? >> का बरे ? जेव्हा मुली काही अपेक्षा व्यक्त करत आहेत , तेव्हा त्या मुळे होणाऱ्या परीणामांना (उशिरा लग्न किंवा लग्न न होणे ) सामोरे जायची त्यांची तयारी आहे. अशात जर ईतरांनी त्यांना तडजोडीस भाग पाडले तर अशा विवाहात घटस्फोटाची शक्यता वाढते.
आणि मुलांचे जर लग्न यामुळे लांबत असेल असे तुम्हाला वाटतेय , तर ती मुले तरी जी मुलगी 'हो' म्हणेल तिच्याशी लग्नाला तयार होतात का ? काळ्या , जाड्या मुलिं , दिसायला फरशा चांगल्या नसलेल्या मुलीना लग्नाच्या बाजारात कुठे लवकर यश मिळते ?
थोडक्यात आता शिक्षण आणि नोकरी मुळे काही समाजात तरी मुलींचे सक्षमीकरण झाले आहे जे भावी 'वर' पक्षाला फारच जड जातेय , खटकतेय , जाचते आहे असे दिसतेय.