खाली श्री. टग्या यांनी सांगितल्याप्रमाणे स्थळ पसंत नाही हे एकमेव कारण बहुतांश ठिकाणी पुरेसे पडते. मात्र गावाकडील घरासमोर गटार आहे (की ज्या घरात राहण्याचा प्रसंग वर्षातून येणारे एखाद-दोन सणवार वगळता त्या मुलीवर कधीही येणार नाही. किंवा आग्रहाने सासूसासऱ्यांनाच पुण्यातील घरात सण साजरे करण्यासाठी बोलावता येईल व जेणेकरून गटाराशी संबंध टाळता येईल) किंवा घरात भारतीय पद्धतीचे शौचकूप आहे (जे बदलणे सहजशक्य आहे) ही कारणे त्रयस्थांना सांगून आपल्याच स्थळाची आपण शोभा करत आहोत हे मुलींच्या ध्यानी यायला हवे.
थोडासा विचार केला तरी ही कारणे उथळ वाटतात, त्यापेक्षा स्थळ पसंत नाही हे कारण सांगणे उत्तम. मात्र ही कारणे मुलींना सांगावीशी वाटली यावरुनच त्यांचा (अ)प्रगल्भपणा दिसून येतो असे वाटते.