आखुड शिंगी , बहुदुधी आणि तिच्या लाथा पण गोड लागल्या पाहिजे अशा एका गायीची गोष्ट मला नेहमी आठवते.  मध्यमवर्गीय सुशिक्षित  आदर्श स्त्री म्हणजे कशी तर ती  तिच्या संसाराला लागते त्या सर्व तडजोडी करते आणि हासत करते. शिवाय  आपल्या मुलीला हेच शेवटी कसे योग्य आहे तिच्याकरता हे देखील पटवतेः)

अरुंधती-
 अशा अपेक्षांची लिस्ट आधीच कळालेली बरी  .. त्याने मनाची तयारी होते आणि आयुष्य जगणे सोपे जाते. 

अशी विषमता आहेच. कधी उघड आहे तर कधी छुपी.  उघड असलेली परवडते.  लग्न होणे ही काय फक्त मुलींची गरज आहे का? लग्न करण्यामागचा दोघाच्या गरजा आणि हेतू इतके वेगळे असतात का? म्हणजे सगळा नैतिकतेचा ठेका मुलीचा आणि मुलांनी कसेही वागावे? 

 मुलांचे दिसण्यावरून , रंगावरून अवास्तव कौतुक करण्यात, भौतिक सुखाला अवास्तव महत्त्व देण्यात आपण नेमकी कशी पिढी तयार करत आहोत त्याचे भान राहत नाही.  ज्या गोष्टी वयानुसार बदलत जाणार आहेत, ज्या कायमस्वरूपी नाहीत, ज्या मिळवणे तुमच्या हातात नाही त्याचा कशाचा टेंभा मिरवता ? आणि तुमच्यात नाही म्हणून वरून जोडीदारात असावे अशी अपेक्षा कुठल्या तोंडाने करता? हे पालकानी एकदातरी मुलांना  ऐकवले तर मुले कधीतरी विचार करतील, त्यानुसार वागतील असा विश्वास मला आहे.

सून किंवा जावई म्हणजे ऑर्डरनुसार पुरवठा करण्याचा माल नाही, या दुकानात मि ळाला नाही म्हणून किती काळ आणि किती दुकाने शोधत फिरायचे ? एवढे करून तरी मिळालेले सामान जन्मभर तसेच असेल का आणि पटेल का? याचे काय?

व्यंगयुक्त / वांशिक आजार  इत्यादी पर्यंत विचारधारा जायला किती युगे जातील माहिती नाही.  पण ही तडजोड केवळ मुलींनीच का करायची? जी अनुवांशिकता आहे ती पुढच्या पिढीत मुलगा/ मुलगी कुठूनही येऊ शकते हे वास्तव आहे.  त्यामुळे अशा मुलानेही तडजोड करावी हे साहजिक आहे. तसे होत नाही याला कारण विषमता हेच आहे.