काळजात (म्हणजे कॉलेज) असताना ग्रुप डिस्कशनसाठी असाच काहीसा विषय ऐरणीवर घेतला गेला होता (साधारण १० वर्षापुर्वीची गोष्ट). तेव्हा मुलींकडून मुद्दे आले होते की लग्न झाल्यावर जशी सून तिच्या सासूसासऱ्यांची तिच्या आईवडलांप्रमाणे काळजी घेणे अपेक्षित असते तशीच जावयानेही त्याच्या सासूसासऱ्यांची त्याच्या आईवडलांप्रमाणे काळजी घेणे अपेक्षित आहे. आम्ही घरातून बाहेर पडून जर घरात पैसे आणण्यात जमेल तितकी मदत करू तर घरातल्या कामांमध्ये नवऱ्यानेही जमेल तितकी मदत करायला हवी. वगैरे. यावर मुलांकडून एकच प्रश्न आला होता - लग्नाच्या मार्केटमध्ये इतर मुलींच्या अशा अवाजवी अपेक्षा नाहीत. त्याही मुली आम्हाला तेच देणार आहेत जे तुम्ही देऊ कराल, मग आम्ही तुम्हाला पत्करून या अवाजवी अपेक्षा का सोसायच्या? मुलींनी दोन शब्दात उत्तर दिले - गेलात उडत!

आज हा विषय पुन्हा इथे ऐरणीवर आलेला पाहून खळखळून हसू आले. मनात प्रश्न आलाय - लग्नाच्या मार्केटमधल्या अशा अपेक्षा नसणाऱ्या मुली ओस पडल्या का काय आता? कोणाला आयुष्य अवाजवी सोसायला लावायचं म्हणजे नकोनकोसं होतं  बॉ!