Marathwadi येथे हे वाचायला मिळाले:
कमलाबाई सुरपाम, अपर्णा मालीकर आणि नंदा भंडारे या आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या विधवा. त्यांच्या कहाण्या केवळ प्रातिनिधिक आहेत. देशातल्या लाखो विधवांचे प्रश्न त्यांच्यापेक्षा वेगळे नाहीत. विदर्भातल्या विधवांशी बोलल्यानंतर जे विदारक वास्तव समोर आलं ते कोणत्याही संवेदनशील माणसाला आत्मपरीक्षण करायला लावणारं होतं. विकासाच्या थोतांड गप्पा मारणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टराटरा फाडणारं होतं. आणि आपला सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या महाराष्ट्राला मान शरमेनं खाली घालायला लावणारं होतं...