प्रस्तुत लेखकांस एक नम्र विचारणा आहे - कृपया भग्वद्गीता, श्रीकृष्ण , हिंदू धर्म इ. इ. यांच्याविषयी माझ्या मनात अनादर आहे असे समजू नये. आपला भग्वद्गीतेचा अभ्यास आहे हे कळून येते. म्हणून फक्त स्पष्टीकरण जाणून घ्यायचे आहे.

हतो वा प्राप्स्यसी स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम ।
तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः ॥(२. ३७)

आणि

कर्मण्येवाधिकारास्ते मा फलेषू कदाचन।
मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संङ्गोऽस्त्वकर्मणी॥ (२. ४७)

या दोन श्लोकांमध्ये परस्परविरोध नाही काय? एका श्लोकात भगवान युद्ध करण्याची (स्वर्ग/पृथ्वी यांच्या उपभोगाची) फलप्राप्ती सांगतात तर दुसऱ्यात फलप्राप्तीविरोधी विचार मांडतात.असे असेल तर भगवान श्रीकृष्णांनी असे विरोधी उपदेश कसे केले?

हा प्रश्न मी ज्यांना विचारला त्यांनी वेगवेगळ्या मार्गांनी त्याचे थेट उत्तर देण्याचे टाळले असे मला वाटले. आपणाकडून समाधानकारक स्पष्टीकरणाची अपेक्षा आहे.