>>धर्मयुद्ध
>>अर्जुनाला स्वधर्म 
>>कसाबला प्रशिक्षण

कसाबची बातमी नुकतीच वाचलेली दिसते. दहशतवादी नेते चिथावणी देताना (किंवा प्रेरणा देताना म्हणा) हेच शब्द वापरतात असे नाही का वाटत तुम्हाला? जिवावर उदार होऊन लढा; कारण हे युद्ध म्हणजे धर्माला वाचवणे आहे; आणि हे पवित्र कार्य करताना मृत्यू आला तर धर्माने वागल्याचे बक्षिस म्हणून स्वर्गात जागा पक्की! हे कृष्णाचे उद्गार वाटतायत की लष्कर ए तैय्यब्बाचे?  

शब्द तेच आहेत; त्यांचा उद्देश्य तोच आहे; मग फरक कुठे आहे? केवळ कृष्ण आपला आहे म्हणून महान आणि बाकी परके, शत्रूकडचे, म्हणून दोषी?

मला तरी असेच वाटते की मूळ गीतेत भेसळ करण्यात आलेली आहे. आता कर्मण्येवाधिकारस्ते ही भेसळ की हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं ही भेसळ हे शोधावे लागेल. आणि जर तसे नसेल आणि दोन्ही श्लोक मूळ गीतेतले असतील तर कृष्ण हा सध्याच्या राजकारण्यांच्याहून शब्द फिरवण्यात श्रेष्ट असावा.