शब्द तेच आहेत. उद्देश्य तोच नाही. हे स्पष्ट करण्यासठीच मी दोन उदाहरणे दिली.

पांडवाना सुइच्या अग्रावर मावेल इतकी जमीन पण द्यायला तयार नसणार्या, अन्यायी कौरवान्शी आणि त्यांच्यामागे असणार्या शकुनी प्रव्रुतीशी लढायचे होते. स्वतः क्रुष्णानी केलेले शिष्टाइचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले होते ही पार्श्वभूमी या निर्णायक प्रसंगाला होती. कसाब कडे शस्त्र होते, शहीद शशांक मोरे आणि शहीद ओंबाळे यांच्याकडे शस्त्र होते. उभयपक्शी फक्त 'हिन्सक' असा शिक्का तुम्ही माराल का? ते कुठल्या भावात पडेल? सगळा फरक फक्त आपला आणि परका इतकाच असतो? न्याय्य अशी बाजूच नसते?    

लहान मुलगा शाळेत जात नाही म्हणून त्याला आइसक्रीम देतो असे सांगणारा, मी कार मधून सोडतो म्हणणारा आणि तरीही तो ऐकत नाही म्हणल्यावर एक फटका देइन म्हणणारा बाप तुम्हाला तर्कदुष्ट अथवा शब्द फिरवणारा वाटतो?

संदर्भ सोडून एखाद्या श्लोकाचा, वचनाचा विपर्यास करणे सोपे आहे.  सगळी गीता सांगून भगवंतानी शेवटी 'करिष्ये वचनम तव' - तू निर्णय घे अशी विनंती केली. लष्कर ए तय्यबा करणार आहे?  असो.

प्रा. वि. पु. आपटे (इंदूर) यानी त्यांच्या 'विश्वात्मक कर्मयोग' या पुस्तकात गीतेची प्रचलित आव्रुत्ती प्रतिक्शिप्त नाही हे सविस्तर माण्डलेले आहे. अवश्य वाचा.