गीता युद्धखोर प्रव्रुत्तीचे समर्थन करत नाही! 'चला युद्ध करा' असे सांगत नाही. तसे सांगणारा माणूस (सामान्य बुद्धिचा देखील) इतका गहन तत्त्वविचार करेल? की फक्त दुसरा किती नीच आहे हे मनावर बिंबवून ब्रेन वाश करेल? कौरव नीच आहेत, त्याना उडवा आणि स्वर्गातली जागा घट्ट करा अशा अर्थाचे ७०० श्लोक भगवंताला सलग सांगता आले नसते? प्रत्येक माणसाचे युद्ध हे एकच कर्त्यव्य आहे असे गीतेत कुठेही येत नाही.
युद्धाची पार्श्वभूमी मी आधीच विषद केली आहे. युद्धभूमीवरून पळून जाणे हा क्शात्रधर्म नाही याची जाणिव अर्जुनाला करून देणे यात चूक काय आहे? आजही अशा माणसाचे कोर्ट मार्शल होते, की त्याला सद्बुद्धी झाली म्हणून सत्कार होतो? युद्धाला तयार असणे कुणाला चुकले आहे? हे काम फक्त हिंदू, आणि गीतेचे अनुयायीच करतात की काय? असो.
अन्यायानी आपले राज्य हिरावून घेणार्याशी युद्ध करणे आणि जगभर माझ्या धर्माचे राज्य यावे या वेडाचारापोटी अतिरेकी कृत्य करणे यात फरक आहेच! इंग्रजानी लादलेल्या गुलामगिरीविरुद्ध लढणारे स्वातंत्र्य सैनिक, आणि सुखासुखी वेडाचारपोटी परक्या देशात जाउन क्रूरपणे नंगानाच घालणे अतिरेकी सारखेच युद्धखोर आहेत असे म्हणणे आपल्या विवेकबुद्धिचा अपमान आहे!
बाकी पुस्तकात बघून आपल्याला जगावे लागत नाही ही गोष्ट लाजिरवाणी का वाटावी? दुसर्या शिफ्ट मध्ये काम करून आलेल्याने ब्रह्ममुहूर्तावर उठावे असे त्याच्यावर न लादणे हेच परिपक्व धर्म, सन्स्कृतीचे लक्शण नाही का? गीतेत अध्याय १४ आणि अध्याय १८ मध्ये जी त्रिगुणावर आधारित आहार, विहार आणि कर्तव्य विषयक मार्गदर्शक तत्त्वे येतात, ती आजही उपयुक्त आहेत, लवचिक आहेत आणि 'डू' आणि 'डोंट' अशा याद्या देण्यापेक्शा मोलाची आहेत हे ठामपणे का सांगू नये?