सर्व अध्यात्माचा उद्देश आपण मूळात कोण आहोत हे समजणं आहे - शिवाय समाज, राष्ट्र, कुटुंब या संदर्भात ओघानेच येणार्या जबाबदार्या, कर्तव्य चुकवू नयेत हे सांगण्याचा ही आहे. म्हणूनच प्रव्रुत्ती आणि निव्रुत्ती, सन्न्यास आणि कर्म, कर्म सन्न्यास आणि आश्रम सन्न्यास यांचा एकत्र विचार करावा लागतो. गीता तो करते!  वरपांगी विरोधाभासी वाटणारे विचार मांडावे लागतात. त्या पायी वाट्याला येणारया शिव्या आणि ओव्या दोन्ही पचवत स्थितप्रज्ञ राहावे लागते. श्रिहरी लीलया हे करतात. गीतेपासून प्रेरणा घेणारे असंख्य साधक आपापल्या परीने, आपापल्या मार्गाने किती विधायक कार्य करून गेले याचे गणतीच नाही! टिळकांचा कर्मयोग असो, विनोबांचा अनासक्त योग आणि भूदान असो, पाण्डुरंगशास्त्री आठवल्यानी केलेली व्यसनमुक्ती असो. यश, अपयश कुणाला किती आले याचा हिशेब ऐदीपणे बसून राहा असे सांगणार्यानी मागू नये.

पुरेसा अभ्यास न करता थातुर मातुर प्रतिक्रिया देणे, आणि उगाच खजिल होणे ही चूक कोणाची? विवेकानंदांपासून प्रेरणा घेउन एकनाथजी रानडे जे महतकार्य करून गेले, त्यात खारीचा वाटा उचलावा, की स्ट्रिपींग द गुरूज वाचून रामक्रुष्ण समलिंगी प्रेरणांचे दमन करत होते काय यावर चर्वितचर्वण करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

आजचे उदाहरण द्यायचे तर कसाब ला रोखणारे कुणी होते, त्यानी आपले कर्तव्य बजावले म्हणून तुम्ही आम्ही गाणी म्हणणे, पत्ते खेळणे आणि धर्मविषयक अचाट आणि अफाट बोलणे याचा आनंद लुटायला हयात आहोत. आत्ता लढायचा मूड नाही, काही मजा येत नाही म्हणून पळून गेले असते तर काय अनावस्था प्रसंग ओढवला असता? मरणारा मरू दे, मी आपल्या सहज स्थिती आणि तणावमुक्त अवस्थेला प्राणपणाने कवटाळून बसणार, तिची जाहिरातबाजी करणार हे विकृत आणि पुरुषार्थहीन, समाजाला पांगळे करणारे विचार नाहीत का? वाटेल ते झाले तरी युद्ध करणारच नाही असे ठरवणे आजही कुठल्या राष्ट्राला शक्य आहे हे सांगाल काय? १९६२ मध्ये चीन नि आक्रमण केले, कारगिल झाले - त्याना तुमचा एक जवान आणि आमचा एक असे वन टू वन युद्ध करा, आणि वेडेपणा लक्शात आला की कबुतरे उडवा असे सांगणे व्यवहार्य आहे का? व्यक्तिगत स्वार्थाच्या आड एखादी गोष्ट आली, की थयथयाट करणारे महाभाग समाजासाठी, राष्ट्रासाठी काही कर्त्यव्य आहे ही जाणिव कुणी करून दिली तर त्याला चिथावणीखोर ठरवत एकदम विश्वात्मक बुद्धी करतात आणि निराकारला झोंबतात हे मुळीच मान्य होण्यासारखे नाही.

  मला तरी विपरीत प्रसंगात एखाद्या माणसाला कर्तव्यसन्मुख करतान आपण वेगवेगळे दाखले देउन परोपरीने प्रयत्न करतो, तोच भाव वरील दोन श्लोकात दिसतो. पहिला व्यावहारिक सल्ला आहे, दुसरा तत्त्वविचार आहे. उदा. अहिन्सा हा तत्त्वविचार आहे, स्टेनगन घेउन निरपराध लोकान्वर बेछूट गोळीबार करणार्याल ठार करणे ही अहिन्साच आहे. तो व्यवहार आहे. हिन्सा झाली म्हणून भुइ धोपटणार्यानी पाण्डवाना देशोधडीला लाउन कौरव सत्ताधीश झाले असते, श्रीहरीच्या जागी शकुनीच्या सल्ल्याने कारभार चालला असता, तर पुढचा इतिहास काय झाला असता याचा हे थोडा विचार अवश्य करावा.