मृदुला, प्रत्येक सजीवाला चांगल्या वाईटाची जाण असते.

अर्जुनाला महाभारतीय युद्ध "धर्म्य" वाटत होते, ते युद्ध करणे हाच अर्जुनाचा "स्वधर्म" ठरत होता,
पण विरोधीपक्षातील स्वबांधवांप्रतीच्या मोहाने तो युद्धास सिद्ध होऊ शकत नव्हता.

कसाबाला, आपण निरपराध लोकांच्या नृशंस कत्तलीत सहभागी होत असल्याची सम्यक जाण होती, असे तुम्हाला वाटते काय?
स्वतः कसाबाला, त्याला सुपूर्त केलेले काम "धर्म्य" वाटत होते, की स्वार्थसाधनेचा एकमेव मार्ग वाटत होते?

शिवाय, कसाब पाळत होता तो त्याचा "स्वधर्म" नव्हता. हेही इथे नमूद करावेच लागेल.
(वाचा स्वधर्मावरली मनोगतावरची चर्चा आणि नंतर मी इथेच लिहीलेले विनोबांचे प्रवचन)

अर्जुनाला मधला र्जू उगाचच दीर्घ होतो आहे. प्रशासक महोदय जरा लक्ष द्या.