मी बहुदा काही प्रतिसाद उघडत देखील नाही कारण सकाळी प्रशंसा, दुपारी माघार, संध्याकाळी आपल्याला समजले नाही पण अहंकार स्वस्थ बसू देत नाही ही कबूली आणि सकाळी परत नवा लेख! अशा मानसिकतेला बोध दुरापास्त!
त्यात आणखी मजा म्हणजे कालचा एक प्रतिसाद तर मी उत्तर देण्यापूर्वीच मागे घेतला गेला (किंवा प्रशासकांनी बाद केला), आता अश्या परिस्थितीत मानसिकता सैरभैर होणे स्वाभाविक आहे.
असो, मी माझं म्हणणं अत्यंत बुद्धीनिष्ठ पद्धतीनी मांडतो, मला कुणाच्याही वक्तव्यांचे दाखले द्यावे लागत नाहीत. एखाद्या मान्यताप्राप्त ग्रंथाबद्दल लोक भावूक होणं सहाजिक आहे त्यामुळे ज्याचा काहीही संबंध नाही अशा गोष्टी प्रतिसाद म्हणून दिल्या जातील. युद्ध चूकच आहे हे कळायला किमान बुद्धी पुरेशी आहे. काहीच्याकाही लिहीण्यापेक्षा माझ्या एकएक मुद्याचे खंडन करून दाखवा म्हणजे तुमची बुद्धी दिसेल!
संजय