तुझं म्हणणं पटतं आहे मित्रा! पण हे असं त्या चॅनल्स नि पण काही फार उत्साहाने केलेलं नाही. त्यांना जर टीआरपी वाढवायचा असेल तर त्यांना आपला लूक फ्रेश ठेवायलाच हवा. त्यामुळे दर्जाकडे थोडेसे दुर्लक्श करून त्यांना असे करावे लागते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे साम मराठी वर लागणारे संगीत गुरुकुल आणि झी मराठीवर लागणारे आयडिया सारेगमप यांच्या प्रेक्षक प्रतिसादातील फरक! पहिल्या कार्यक्रमात उत्तमोत्तम जजेस येत असून देखील तो फारसा लोकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. दुसरीकडे अवधूत गुप्ते सार्ख्या नव्या संगीतकाराने केवळ त्याच्या कमेंटस च्या जोरावर सारेगमप ला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं आहे. ही खंत करण्यासारखी बाब असली तरी आजच्या घडीची ती गरज आहे. त्यामुळे दर्जाचा विचार थोडासा बाजूला सारून वाहिन्यांचे हे असे अवखळ तारुण्य सिलेक्शन सुरू आहे!