मुद्दा एक बद्दल माझा गैरसमज असावा. माफ करा.
"त्यात जिंकलेल्यांची बाजू खरी करून दाखवली असेल त्यात विशेष ते काय?
"
हे असेल, ते असेल वा हिटलर जिंकला असता तर वगैरे कल्पनाविलास आहे. त्यात कितपत रमावे वा त्याने मनोरंजन करून घ्यावे, बुद्धिभेद नव्हे हे ठरवणे ज्या चा त्याचा प्रश्न आहे. शेवटी सुष्ट वा दुष्ट असे काळे आणि पांढरे नसतेच. ज्याचे त्याचे तारतम्य, पूर्वग्रह, जगावेगळ्या वाटेने जाण्याची हौस, शब्दचिकीत्सा करण्याचे प्रमाण, ती सोडून कार्यप्रव्रुत्त होण्याची वृत्ती, श्रद्धा , व्यक्तिगत अनुभव अशा असंख्य गोष्टींचा एकत्रित परिणाम होतो. गीतेतील श्रद्धात्रय विभाग योग, दैवी असुरी संपत्तीचे वर्णन हा भाग असे तारतम्य बाळगताना उपयुक्त ठरू शकेल असे नम्रपणे सुचवतो.
कुठलाही सद्ग्रंथ वाचताना त्यातल्या शब्दाइतकीच वाचणार्याची मनोभूमिका निर्णायक ठरते. विसंगती हुडका, काटछाट करा. गीता आणि तिच्याविषयीच्या टीकांचे शुद्धिकरण करण्यात कित्येक पिढ्या गारद होतील इतके ते विपुल साहित्य आहे. कल्पनाविलास करा, दुर्योधनाला हीरो ठरवीत कादंबर्या लिहा. श्रद्धेने सामोरे जाउन जीवनाचे सार्थक होण्याचा मार्ग शोधा. सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली नित्याच्या प्रश्नान्साठी काही मार्गदर्शक तत्त्वे मिळतात का बघा, मिळाली तर आपले वर्तन सुधारा. मला हवे तसे गीतेत आहे का हे शोधा, नाही असे वाटले तर रद्दीत घाला. मर्जी ज्याची त्याची.
रावण जिंकला असता तर खुळ्या लोकानी त्याला विष्णुचा अवतार मानला असता, आणि दुसर्याची बायको पळवून नेउन खुन्नस देणे हे धार्मिक कृत्य ठरले असते असे मला तरी वाटत नाही. ज्याला पटत असेल त्यानी तसे समजावे.
सर्वसामान्याना कितपत समज असते याविषयी ज्याचा त्याचा वेगळा समज असणे स्वाभाविक आहे. असो.