युद्ध ही मानवी कल्पना आहे नियती नाही त्यामुळे युद्ध अनिवार्य आहे अशी भूमिका घेतली तर सगळेच संपले.

"मी देह नाही तर आत्मा आहे" असा बोध झालेल्या आपल्यासारख्याने युद्धविरोधी भूमिका घ्यावी हे तर्काला पटत नाही. कारण सांगतो. "मी देह आहे" असे समजणारे लोक पृथ्वीवर न्याय असावा, अन्यायाला शिक्षा असावी आणि युद्ध हे शिक्षेचा एक पर्याय समजावा असे मानतात. कारण अश्या लोकांचे "निरपराध मनुष्याला हानी पोचवणे हा अन्याय आहे आणि त्याचा प्रतिकार केलाच पाहिजे"हे गृहीतक आहे. प्रत्येक मनुष्याला जीवाची भीति असल्याने निदान या धाकाने तरी न्याय प्रस्थापित होईल असे हे लोक समजतात.

आता आपल्यासारखे लोक "देह विनाशी आहे, आत्मा अमर आहे" म्हणतात मग युद्धाने अनेक लोकांच्या शरीराचा नाश झाला तरी आत्म्याला काहीच हानी न पोचल्याने युद्धाने नेमके काय नुकसान होते? "नैनं छिंदंती शस्त्राणि, नैनं दहती पावकः... " हे जर खरे असेल तर मरू द्या हव्या तितक्या लोकांना (देहांना),  आत्म्याला काय त्याचे?

म्हणजे

१. जे (बहुसंख्य) अज्ञानी लोक "मी देह आहे" असे समजतात त्यांच्या न्याय, नीति, यांच्याबद्दलच्या कल्पनांमध्ये युद्ध हा शेवटचा पर्याय म्हणून का होईना समजण्यासारखा आहे.

२. भोंगळ मानवतावादी लोक अत्याचारी आणि न्यायी यांच्यामध्ये फरक न करता सरसकट युद्ध वाईट समजतात आणि त्याला विरोध करतात.

३. आपल्यासारखे आत्मसाक्षात्कारी लोक कुठल्याही तार्किक युक्तिवादाशिवाय "युद्ध वाईट" अशी भूमिका घेऊन तेच तेच परत परत सांगत असतात.

विनायक