अस्तित्व एक आहे ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे म्हणजे तुम्हीच आहात, दुसरा असा कोणी नाही. तुम्ही जेंव्हा दुसऱ्याशी शत्रुत्व घेता तेंव्हा तुम्हाला त्रास होतो त्यामुळे दुसरा काय करतो हे दुय्यम आहे.
तुम्ही व्यक्तीगत जीवनात बघा, क्रोध हा सगळ्यात जवळचा पर्याय असतो पण तुम्ही थोडे जरी सावरलात तरी तुम्हाला दुसरे पर्याय देखील दिसायला लागतात आणि तुमची चित्तदशा एकसंध रहाते
१) "आता आपल्यासारखे लोक "देह विनाशी आहे, आत्मा अमर आहे" म्हणतात मग युद्धाने अनेक लोकांच्या शरीराचा नाश झाला तरी आत्म्याला काहीच हानी न पोचल्याने युद्धाने नेमके काय नुकसान होते? "नैनं छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावकः... " हे जर खरे असेल तर मरू द्या हव्या तितक्या लोकांना (देहांना), आत्म्याला काय त्याचे?"
इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, आत्मा म्हणजे तुम्हीच आहात त्यामुळे पुरेशी संवेदनाक्षमता असेल तर प्रत्येक संहारानी तुम्हाला दुखः होतेच म्हणून तर युद्ध हा पर्याय अयोग्य आहे.
"१. जे (बहुसंख्य) अज्ञानी लोक "मी देह आहे" असे समजतात त्यांच्या न्याय, नीती, यांच्याबद्दलच्या कल्पनांमध्ये युद्ध हा शेवटचा पर्याय म्हणून का होईना समजण्यासारखा आहे.
२. भोंगळ मानवतावादी लोक अत्याचारी आणि न्यायी यांच्यामध्ये फरक न करता सरसकट युद्ध वाईट समजतात आणि त्याला विरोध करतात.
३. आपल्यासारखे आत्मसाक्षात्कारी लोक कुठल्याही तार्किक युक्तिवादाशिवाय "युद्ध वाईट" अशी भूमिका घेऊन तेच तेच परत परत सांगत असतात. "
इथे मी एक अत्यंत मोलाची गोष्ट नमूद करू इच्छितो जसे व्यक्तिगत मन असते तसेच राष्ट्रीय-मन (म्हणजे त्या देशातील बहुसंख्य लोकांची मान्यता) देखील असते. आता जवळजवळ सर्व भारतियांची शेजारी राष्ट्राबद्दल एक ठराविक मानसिकता आहे अशी बहुसंख्य लोकांची मानसिकता युद्धाची शक्यता निर्माण करते कारण युद्धासाठी जवळजवळ सगळे राष्ट्र तयार असावे लागते.
तुम्ही नीट बघा युद्धात मरणाऱ्यांचे एकमेकात काहीही वैर नसते, त्यांनी एकमेकांना पाहीले देखील नसते पण युद्धा म्हंटल्यावर सगळा सारासार विचार संपतो, केवळ संहार आणि त्यातून होणारी अपरिमीत हानी एवढेच उरते. यातून मानवानी केलेला सर्व विकास पूर्ण धुतला जातो, आपण अनेक वर्ष मागे जातो कारण पुन्हा निर्मिती करावी लागते.
आता मी परत शेवटी तेच लिहीतो, आजपर्यंत मानवी इतिहासात जवळजवळ पाच हजार युद्धे खेळली गेली काय निषन्न झालं आहे?
तुम्हाला आत्मा कळो न कळो बुद्धीमत्ता नक्कीच आहे आणि बुद्धीमत्ता प्रश्न सोडवण्यासाठी विधायक पर्याय शोधते असं तुम्हाला वाटत नाही का?
तुम्हाला सहज पटेल का नाही माहिती नाही पण एखाद्याला बेशर्त आणि अत्यंत मनापसून क्षमा करून बघा, एका क्षणात तो तुमचा होतो, जीवनाचा सगळा रंग बदलतो, सगळे प्रश्न या एकरूपते पुढे नगण्य होतात कारण कलह मानसिक आहेत आणि एकरूपता अस्तित्वाचा स्वभाव आहे.
संजय