आजकाल  मराठी चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात येतायत. त्यात मोजकेच बघण्यासारखे असतात. भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव ह्यांच्या उगाचच loud 'comedies' चा तर वीट आलाय. हिंदी मधे अवस्था तीच आहे. चित्रपटाच्या दर्जा पेक्षा आजकाल "साईज झीरो फ़िगर , ड्रेस डिजाईन्स,पदेशातली लोकेशन्स " वर  जास्ती लक्ष दिल जात याच वाईट वाटत.