अस्तित्व एक आहे ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे म्हणजे तुम्हीच आहात, दुसरा असा कोणी नाही. तुम्ही जेंव्हा दुसऱ्याशी शत्रुत्व घेता तेंव्हा तुम्हाला त्रास होतो त्यामुळे दुसरा काय करतो हे दुय्यम आहे.
मीच सर्व असेन तर शत्रुत्व कोणाशी घेणार? दुसरा, त्रास, दुय्यम या शब्दांना काहीच अर्थ राहत नाही.
इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, आत्मा म्हणजे तुम्हीच आहात त्यामुळे पुरेशी संवेदनाक्षमता असेल तर प्रत्येक संहारानी तुम्हाला दुखः होतेच म्हणून तर युद्ध हा पर्याय अयोग्य आहे.
मीच सर्व असेन तर संवेदना, संहार, दुःख, युद्ध, योग्य - अयोग्य अश्या सर्व संकल्पना निरर्थक ठरत नाहीत का? कारण या कल्पना माझ्यापेक्षा वेगळ्या आहेत असे तुम्ही समजता आणि ते "मीच सर्व आहे"या गृहीतकाच्या विरुद्ध आहे.
मी आत्मा असेन तर आत्मज्ञानी मनुष्याकडून भूमिका शक्य आहेत.
१. युद्धाबद्दल उदासीन - शरीरे मारून काय होणार? आत्म्याला काहीच होणार नाही. जसे एकदा सावरकरांना बेळगावबद्दल विचारले असता ते म्हणाले होते "बेळगाव महाराष्ट्रात राहो की कर्नाटकात, जोपर्यंत ते भारतात आहे तोपर्यंत मला काही फरक पडत नाही" तशी भूमिका आत्मज्ञानी मनुष्याकडून अपेक्षित आहे.
२. मी जरी आत्मज्ञानी असलो तरी बहुसंख्य लोक हे शरीरास मी समजणारे असल्याने त्यांचे नीती, न्याय वगैरेंबद्दलचे नियम मला पाळणे आवश्यक आहे. त्यातूनही भगवद्गीतेने अशा मनुष्यास
मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे ।
लोकांमाजी नोहावे । अलौकिक ॥
असे सांगितल्याने न्याय, नीती यांची स्थापना करणे माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठी आवश्यकता पडल्यास युद्धाचीही तयारी हवी.
आपण सोयीचे असेल तेव्हा सर्व मीच आहे म्हणता आणि सोयीचे असेल तेव्हा "संवेदनाशीलता, बुद्धिमत्ता, क्षमाशीलता" वगैरे एखाद्या शरीरालाच मी समजणाऱ्या व्यक्तीप्रमाणे नैतिक युक्तिवाद करता. यात परस्परविरोध आहे असे आपल्या लक्षात येत नाही.
शेवटी ज्ञानेश्वरीत युद्धविरोधी अर्जुनाला उद्देशून श्रीकृष्ण काय म्हणतात ते सांगण्याचा मोह आवरत नाही.
तू जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेते न संडीसी ।
आणि शिकवूं म्हणो तरी बोलसी । बहुसाल नीति ॥
विनायक