मीच सर्व आहे म्हणजे आत्मा, शरीर, भावना, बुद्धी, सहिष्णुता सर्व काही मीच आहे. मी शरीरात असताना एकावेळी शरीर (आकार) आणि निराकार (अमृत) दोन्ही आहे हे खरे अध्यात्म आहे, ही आत्मज्ञान झालेल्याची चित्तदशा आहे. निराकाराचा बोध नसल्यामुळे मला मी व्यक्ती वाटतो आहे.
"मीच सर्व असेन तर शत्रुत्व कोणाशी घेणार? दुसरा, त्रास, दुय्यम या शब्दांना काहीच अर्थ राहत नाही"
हीच तर आतापर्यंत झालेली सर्वात मोठी अध्यात्मिक चूक आहे. युद्ध मला दुःख पोहचवू शकत नसेल तर गीतेची गरज कुठे आहे?
तुम्ही समजता आहात की कौरव चूक आहेत आणि म्हणून पांडव बरोबर आहेत आणि त्यामुळे युद्ध योग्य आहे, मी म्हणतो दोघही चूक आहेत कारण कलहाचं मूळ कारण आहे मनात आहे, बोध नसण्यात आहे.
"मी आत्मा असेन तर आत्मज्ञानी मनुष्याकडून भूमिका शक्य आहेत".
नाही आत्मज्ञानी भूमिका घेत नाही तो कमीतकमी हिंसा होईल असा पर्याय शोधतो
"१. युद्धाबद्दल उदासीन - शरीरे मारून काय होणार? आत्म्याला काहीच होणार नाही. जसे एकदा सावरकरांना बेळगावबद्दल विचारले असता ते म्हणाले होते "बेळगाव महाराष्ट्रात राहो की कर्नाटकात, जोपर्यंत ते भारतात आहे तोपर्यंत मला काही फरक पडत नाही" तशी भूमिका आत्मज्ञानी मनुष्याकडून अपेक्षित आहे."
हाच विचार साऱ्या अस्तित्वाला लावा. सगळं जगातच आहे, काही कुठे हलत नाही, सीमारेषा मानवी आहेत, संपलं युद्ध!
"२. मी जरी आत्मज्ञानी असलो तरी बहुसंख्य लोक हे शरीरास मी समजणारे असल्याने त्यांचे नीती, न्याय वगैरेंबद्दलचे नियम मला पाळणे आवश्यक आहे."
ज्यावेळी कौरव युद्धाचं आव्हान देतात आणि पांडव तयार होतात तेंव्हा दोघही एकाच पातळीवर येतात. युद्ध हा अज्ञानी लोकांचा पर्याय आहे, मग ज्ञानी आणि अज्ञानी यात फरक काय राहीला?
"आपण सोयीचे असेल तेव्हा सर्व मीच आहे म्हणता आणि सोयीचे असेल तेव्हा "संवेदनाशीलता, बुद्धिमत्ता, क्षमाशीलता" वगैरे एखाद्या शरीरालाच मी समजणाऱ्या व्यक्तीप्रमाणे नैतिक युक्तिवाद करता. यात परस्परविरोध आहे असे आपल्या लक्षात येत नाही".
माझी कसली आलीय सोय? मी तुम्हाला निर्विवादपणे एकच सांगतोय की कलह भ्रांत मानवी मनाचा, उद्विग्नतेचा, निराकार न समजल्याचा परिणाम आहे आणि युद्ध हा तो सोडवण्याचा अत्यंत अयोग्य पर्याय आहे.
तुम्ही अत्यंत मनापासून एका गोष्टाचा विचार करा: मला युद्ध हा मानवी कलह सोडवण्याचा अयोग्य पर्याय आहे हे सांगायला एकालाही मध्ये आणायला लागत नाही का कुठले वचन उधृत करायला लागत नाही की कुणालाही व्यक्तीगत काही बोलायला लागत नाही याच कारण मी वस्तुस्थिती सांगतोय आणि जगातली युद्ध बंद व्हावीत एवढी माझी एकच इछा आहे
संजय