कुशाग्र... ही जर फक्त कथा असेल तर ठीक... परंतु असे शक्य नाही... गर्भाचे लिंग गर्भधारणेच्या वेळेसच निश्चित होत असते... आणि माझ्या माहीतीत अजूनही हे शक्य करण्याइतके विज्ञान पुढे गेले नाही.... ही जर खरी घटना असेल तर मला त्या डॉक्टर चे नाव माहीत करून घ्यावेसे वाटते.... म्हणजे पत्रकारांना कळवून खरे खोटे माहीत करून घेता येईल... आणि गर्भाचे लिंग बदलले जाते असे सांगून कोणी लोकांची फसवणूक करत असेल तर अश्या ढोंगी डॉक्टर चा पर्दाफाश करता येईल.
किंबहुना हे कथेमध्येही वाचण्यास विचित्र वाटले... विशाल आणि मीता ह्यांसारखी करीअर ओरिएंटेड पात्र अश्या गोष्टी करायला तयार होतात हे सुद्धा पटत नाही....
दुसरे म्हणजे... एक निरुपद्रवी औषधी उपचार करायला तुझी संमती घेण्याची त्याना आवश्यकता वाटली नाही
नव्याने शोध लावलेली औषधे निरुपद्रवी? एका गर्भवती स्त्री वर असे प्रयोग तिच्या परवानगी शिवाय? तिच्या नवय्राला आपल्या होउ घातलेल्या अर्भकाबद्दल प्रेम नाही? त्याच्या जीवाशी, लिंगाशी असे खेळ करू देण्यास सुशिक्षित माणसाची तयारी आहे? त्याला आपल्या आइ वडिलांना ठणकावून सांगता आले नाही की माझे माझ्या होणाय्रा बाळावर तेवढेच प्रेम असेल.. मग ती मुलगी असो वा मुलगा..? त्याच्या एकदाही मनात आले नाही की ही औषधे नक्की निरुपद्रवी असतील? त्यांनी माझ्या बाळाच्या आणि बायकोच्या जीवाला काही धोका नक्की होणार नाही...? आणि मुलगी किवा औषधांचा विपरीत परिणाम होउन अपंग, मतीमंद, गतीमंद, मूल किंवा अजून विपरीत काही घडले असते... (लिंग निश्चिती नसलेले मूल) तर काय केले असते ह्यांनी? स्वतःचे तर आहेच... पण ज्या डोळ्यांनी अजून जग पाहिले नाही त्या जीवाला ह्या संकटांनी भरलेल्या जगात किती विपरीत परिस्थितीमध्ये आणले असते... किती नुकसान होउ शकले असते??? मीता सारखी मुलगी ह्याला नवय्राच्या दबावामुळे तयार होते हे सुद्धा पटत नाही.... तिचे वर्णन वाचून तरी असे वाटते की तिच्यासारखी मुलगी ह्याला बळी न पडता घराबाहेर पडली असती.
असो... मला ही कथा पटली नाही... तुम्ही लिहिलेले लिखाण मि आधीही वाचले आहे... पण हे पटले नाही म्हणून म्हंटले...
लिहीत राहा...
प्रज्ञा.