गेल्या काही महिन्यांतील मुलांच्या आत्महत्यांना सरकार घाबरलेलेच आहे. त्यामुळे सोप्या प्रश्नपत्रिका काढाव्यात, उत्तरपत्रिका तपासताना गुण शढळ हाताने द्यावेत, मुलांवर ताण येऊ नये असा अभ्यासक्रम असावा हे सर्व चालूच आहे. आता त्यात हीदेखील भर आहे.
मला वाटते, ज्या मुलांचा बुध्यांक उत्तम आहे त्यांना अश्या संधीमुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर अवांतर गोष्टी शिकता येतील ह्यामुळे.... कारण सोप्या अभ्यासाने व आव्हानाच्या अभावामुळे ती लवकर बोअर होतील. आणि ज्यांचा बुध्यांक तुलनेने कमी आहे किंवा आकलनशक्ती कमी आहे त्यांना किमान आठवी पासचा दर्जा मिळून नोकरी-व्यवसाय-उदीमास मदत होईल. कमीत कमी आपलं पोरगं/ पोरटी नापास होणार नाही ह्या भिस्तीवर अनेक पालक (खेड्यांतील) आपापल्या पोरांना किमान आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण करू देतील.