आठवी पास तरी कशाला?शाळा बंद कराव्यात . त्या जागी मॉल उघडावेत. नाहीतरी मॉलसंस्कृती मध्ये मुलं जे शिकतात ते जास्त महत्त्वाचं आहे. मुलांना घरी पालकांनी शिकवावे व सरकारने ऐच्छिक परीक्षा ठेवाव्यात. शिक्षणाचा दर्जा घसरत घसरत शेवटी शाळा बंद कराव्या लागणार आहेतच . आज मराठी माध्यमाच्या बंद पडतायत. हळू हळू इतरही बंद पडतील. नाहीतरी वागणूक व वैयक्तिक आर्थिक प्रगती शिक्षणावर अवलंबून आहेतच असे क्वचितच दिसते.म्हणजे मुलं गाणं , क्रिकेट (इतर काही खेळ वा कला शिकतील. आजकाल घरटी एक गायक अथवा वादक सापडतो.)वगैरे मोकळेपणाने शिकतील तरी.म्हणजे शिक्षक हा प्राणी कायमचा नष्ट होइल, व त्यापाठोपाठ येणारी आंदोलने(पे कमिशन प्रमाणे पगारवाढ)आपोआप बंद होतील. कोणालाच त्रास नाही. सरकारलाही नाही. दरवर्षी शिक्षणक्रमाचा आढावा घेऊन त्यात बदल