आठवी पास तरी कशाला?शाळा बंद कराव्यात . त्या जागी मॉल उघडावेत. नाहीतरी मॉलसंस्कृती मध्ये मुलं जे शिकतात  ते जास्त महत्त्वाचं आहे. मुलांना घरी पालकांनी शिकवावे व सरकारने ऐच्छिक परीक्षा ठेवाव्यात. शिक्षणाचा दर्जा घसरत घसरत शेवटी शाळा बंद कराव्या लागणार आहेतच . आज मराठी माध्यमाच्या बंद पडतायत. हळू हळू इतरही बंद पडतील. नाहीतरी वागणूक व वैयक्तिक आर्थिक प्रगती शिक्षणावर अवलंबून आहेतच असे क्वचितच दिसते.म्हणजे मुलं गाणं , क्रिकेट (इतर काही खेळ वा कला शिकतील. आजकाल घरटी एक गायक अथवा वादक सापडतो.)वगैरे मोकळेपणाने शिकतील तरी.म्हणजे शिक्षक हा प्राणी कायमचा नष्ट होइल, व त्यापाठोपाठ येणारी आंदोलने(पे कमिशन प्रमाणे पगारवाढ)आपोआप बंद होतील. कोणालाच त्रास नाही. सरकारलाही नाही. दरवर्षी शिक्षणक्रमाचा आढावा घेऊन त्यात बदल 
करण्याचे कष्ट नाहीत व त्या बदलाला होणारा विरोध हाही नाही.शाळा कॉलेजांमधील ऑन लाईन प्रवेश, वशिल्याच्या चिठ्ठ्या , प्रवेशा साठीच्या
भरमसाठ घेण्यात येणाऱ्या देणग्या हे सगळच बंद होईल. राखीव जागा, प्रवेशासाठी होणारी भांडणं सगळं बंद. सगळेच खुले. शिक्षणक्षेत्रातले सगळे प्रश्नच मिटतील. कारण शिक्षण क्षेत्र असं राहणारच नाही. गंमत आहे कि नाही ?