माझं मत असं आहे की परीक्षा घ्याव्यात आणि त्यांचे निकालही जाहीर करावेत, परंतू गुणपद्धतीऐवजी वर्गवारीपद्धत (ग्रेडींग) अमलात आणावी. त्याने होईल काय की एकेका गुणामुळे मुलांच्यात (आणि पालकांच्यात) होणारी निरर्थक स्पर्धा आधी नाहीशी होईल. विद्यार्थ्याची आवड लक्षात येईल, त्याला खतपाणी घालता येईल (हे खूपच 'आयडियल' आहे. दुर्दैवाने तशी मानसिकता आणि तशी परिस्थिती भारतात नाही.) आणि मुलेसुद्धा नापास जरी होणार नसली तरी, निदान वर्ग मिळवण्याच्या हेतूने विषयाचा किमान अभ्यास तरी करतील.