तिकडे ओबामा शिक्षणावर भर द्या म्हणून कंठशोष करतो आहे आणि इकडे आपण सरकारी मार्गाने शिक्षणाचा बोऱ्या वाजवतो आहोत. छान!
आमोद२७ ची वर्गवारीपद्धत आवडली. त्यामुळे एकेका गुणासाठी होणारी जीवघेणी शर्यत आणि ओढाताण थांबेल. तसेही प्रगत अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षांचे गुण जास्ती ग्राह्य धरतात.
कोवळ्या वयाच्या मुलांनी अभ्यासाच्या/निकालाच्या दडपणाने आत्महत्या करणे ही खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे. पण अश्या विद्यार्थ्यांचे एकूण विद्यार्थीसंख्येशी काय प्रमाण अथवा टक्केवारी आहे? समजा एक टक्का असेल तर इतर ९९% विद्यार्थ्यांचे या १% विद्यार्थ्यांसाठी नुकसान करायचे का? आणि सदर जी आर मुळे विद्यार्थी आत्महत्या करायचे थांबणार आहेत का?
धेयवेडा यांचा "कच्च्या भिडू"चा मुद्दा अंगावर काटा आणणारा असला तरी डार्विनच्या सिद्धांताचा विचार करता फार गैर आहे असे वाटत नाही. अर्थात सामाजिक दृष्टिकोनातून मी धेयवेडा यांच्याशी असहमत आहे. कारण जे अभ्यासात नापास होतात ते समाजासाठी एकदम निरूपयोगी असतात असे जरूरी नाही.
प्रश्न असा आहे की विद्यार्थी आत्महत्या करतात याचे नक्की कारण काय आहे? सदर जी आर द्वारे आपण प्रश्नाच्या मुळावर घाव घालतो आहोत की आपल्याच पायावर?