मित्रा , चर्चेचा विषय छान आहे पण जागा चुकला आहेस .
इथे कुणाला खास अशी आपुलकी नाहीये या विषयी !

मराठी च प्रेम असणारे  मराठीचं एकसुरीकरण(पुणेरीकरण) करण्यात व्यस्त आहेत ,
पुण्यात भय्याने पसरलेले हात पाय त्यांना दिसत नाहीत शिवाय परप्रांतियांमुळे गुन्हे वाढत नाहेत असे ही काहींचे ठाम मत आहे .

शिवसेना येथे चेष्टेचा विषय आहे , ज्या घाणाणाती भाषेत अग्रलेख लिहून अत्र्यांनी , भाषणे करून बाळासाहेबांनी मुंबै महाराष्ट्रात राखली , त्या भाषेला " शिवसेनट " असे उपहासात्मक नाव देण्यात आले आहे ! ( तेही येथील एका ज्येष्ठ साहित्यिकाकडून !    )

असो . मी  येथे या विषयावर बोलणे सोडून दिले आहे .

तुका म्हणे "उगी राहावे । जे जे होईल ते ते पाहावे " ॥