"पांढऱ्या कॉलरचे हमाल" म्हणून स्वतःला गणणारे काही मित्र आहेत. त्यांच्याजवळ पैसा भरपूर आहे, पण खर्च करायला वेळ नाही. नुकताच श्री. नारायण मुर्तींचा ईमेल वाचला, ज्यात त्यांनी आपले काम ८ तासात करू शकत नाही, तो "बॅड मॅनेजर" आहे असं म्हटलं होतं. पण मग ते स्वतःच्या कंपनीत हा प्रयोग का करत नाही. (करत असल्यास कल्पना नाही. ) बऱ्याच आधी आय टी मध्ये "मानसोपचार तज्ज्ञ" आहेत असही कळलं.

उगाच एका व्यक्तीकडून मरमर काम करवून घेण्यापेक्षा, थोडा कमी पैसा, अधिक व्यक्ती आणि सुखी कर्मचारी असं नाही होवू शकत का ? ५ ला कंपनी बंदच करणे जमणार नाही का ?

विजय - आय. टी. अनभिज्ञ