पूर्वी (म्हणजे १९८० च्या सुमाराला) पुण्यातले विठ्ठलवाडीचे विठ्ठलमंदिरही
अगदी एका बाजूला, पडके, दुर्लक्षित आणि कदाचित म्हणूनही गजबज नसलेले असे
शांत स्थळ (म्हणजे जागा) होते.
साधारणतः त्याच सुमारापर्यंत ॐकारेश्वराचे मंदिरही असेच बऱ्यापैकी शांत वाटायचे. विशेषतः रात्रीच्या वेळी. शेजारीच सुरू होणाऱ्या बालगंधर्वकडे जाणाऱ्या पुलावरदेखील तेव्हा फारशी रहदारी नसे. रात्रीच्या वेळी अनेकदा पुलाच्या मध्यभागी असलेल्या किंवा पुलाच्या बाजूच्या पादचारी पट्ट्यांना वेगळे करणाऱ्या काँक्रीटच्या दुभाजकांवर ठिकठिकाणी अनेक कुटुंबे (स्कूटरने आलेली असल्यास बाजूलाच स्कूटर लावून वगैरे, नाहीतर तशीच) सहलीला आल्यासारखी खालच्या नदीवरून वाहणाऱ्या हवेचा आस्वाद घेत निवांतपणे बसलेली आढळत. सांगायचा मतलब, त्या काळी त्या परिसरात रहदारी फारशी नसे, आणि एकंदरीत सगळा निवांत माहौल असे. मंदिरातही फार गर्दी नसे. त्यामुळे ते एकंदरीत बऱ्यापैकी शांत स्थळ होते. निदान त्या काळी. आताचे माहीत नाही.