मी आजही पुण्यात जेव्हा जातो, तेव्हा अरण्येश्वराच्या देवळात सायंकाळी ७-१५ ते ७-४५ मध्ये हजेरी लावतोच. तुम्ही म्हणताय तितके नसले तरी आजच्या जगातल्या कोलाहलाच्या तुलनेत देऊळ फारच शांत असते/भासते. देवळात प्रकाशही 'लख्ख' म्हणण्यासारखा नसला तरी शांत, सौम्य स्वरूपाचा असल्याने बरे वाटते.
पुण्याबाहेरच्या देवळांबद्दल बोलयचे झाल्यास भारतातील देवळांबाबत विशेष माहिती नाही. मात्र अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लिवरमोर च्या बालाजी मंदिरातले वातावरण अत्यंत शांत, धीरगंभीर आणि पवित्र आहे (स्वानुभव! ) तेथे पाऊल टाकल्यावर उदबत्त्या/धूप, चंदन/गंध, फुले इ. च्या खास करून देवळांमध्ये अनुभवण्यास मिळणाऱ्या सुगंधामुळे तर मन अधिक प्रसन्न होते.