पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
सध्या महाराष्ट्र उन्हाने आणि वीजेच्या प्रश्नावरून तापला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्याला अप्रत्यक्षपणे आणि वीजेच्या संकटालाही आपणच प्रत्यक्ष जबाबदार आहोत. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघानीही गेल्या पन्नास वर्षांत भविष्यातील वीजेची गरज लक्षात घेऊन काहीच उपाययोजना केली नाही. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.