आपण लेखावर टीका करायची सोडून लेखकावरच का धावून जाताय हे समजत नाही , शिवाय आपली प्रतिक्रिया ( लेख सोडून लेखकावर धाउन जाणे , विचार सोडून वैचारिकाला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणे ) ही सर्व अध्यात्मिक लोकांची प्रतिक्रियेचे प्रतिक मानली तर , चार्वाकाचे काहीच साहित्य उपलब्ध नसणे , बौद्ध धर्मासारख्या विज्ञानवादी धर्माचे भारतात नामशेष होउन जाणे वगैरे गोष्टींचे व्यवस्थित स्पष्टीकरण देता येइल .
१) शरीर कसे आणि किती टिकू शकेल ?
>>> किती टिकू शकेल> जितके टिकू शकेल तितके आणि कसे टिकू शकेल > जसे टिकू शकेल तसे , थोडक्यात अस्तित्व टिकवणे हे महत्त्वाचे आहे शक्य तितका काळ , जसे जमेल तसे ! आपण निसर्गाचे नीट निरिक्षण केले तर हेच आपल्या ध्यानात येइल कोणताही जीव कधीच सहजा सहजी शरीर टाकायला तयार नसतो , मग ते शरीर कसे का असेना किती ही जीर्ण विदीर्ण का असेना !
२) जर श्वास किंवा हृदय या सारख्या मूळच गोष्टी तुमच्या आवाक्या बाहेर
असतील तर ते टिकवणे तुमच्या कितपत हातात आहे ?
>>> "श्वास , हृदय या गोष्टी आपल्या आवाक्या बाहेर आहेत ,त्यामुळे शरीराचे अस्तित्व दैवाधीन आहे म्हणून अध्यात्माला लागा ! " ह्या तर्काने जर आपण अध्यात्माचा प्रचार करत असाल , तर काय बोलणार पुढे ?? भोळी भाबडया लोकांना आपण जरुर भुलवू शकता युक्तीवादाने !! ह्या सत्कार्यासाठी शुभेच्छा ( देवू शकत नाही .. ) !!!
मला एक गोष्ट प्रकर्शाने जाणवते आहे , आपण कोठेही रोखठोक पुरावा द्यायला तयार नाही , हा तार्किक द्रृष्ट्या आपल्या मताचा पराभव असला तरी आपल्या पेक्षा मला त्याचे जास्त दुःख आहे .